Saturday, January 27, 2007

शून्य

ते समोर झाड दिसतंय?
त्यात लपून रोज पहाटे एक पाखरू गायचं..
अलवार सुरांतून रोज आव्हान द्यायचं..
'बोल, मी दिसलो नाही म्हणून मी नाहीच आहे असं म्हणशील??'
मग दिवसरात्र छळायचे
ते सूर.. ते प्रश्न..
शेवटी एकदा मी चिडून त्याला म्हटलं
'नाहीयेस..! नाहीच आहेस तू..!!
असतास खरंच तर दिसला नसतास?
एकदा तरी? चुकून तरी??'

तेव्हापासून
सगळं शांत शांत आहे इथं..
सूर छळत नाहीत.. प्रश्न पडत नाहीत..
सूर्य उगवतो रोज,
पण दिवस उजाडत नाहीत...

10 comments:

Abhijit Bathe said...

sahee!

पूनम छत्रे said...

baapare!
kasala lihites ga..

वैभव जोशी said...

सूर्य उगवतो रोज
पण उजाडत नाही....

खास

स्नेहल said...

swati, u r too impulsive!!!

Meenakshi Hardikar said...

सुंदर गं ...

अश्विनी सातव said...

hi vaachali hoti maaybolivar. temvhaahI itakich aavaDali hoti...mast!

Anonymous said...

wah!

माणिक जोशी said...

धन्य आहेस तु, कसं सुचत तुला?
सहि है यार !

Saur said...

khatarnak!!!
(excuse me for the language)
pan khup sahi ahe

विशाखा said...

Simply brilliant. Ekdum Chataka lavun geli.