Friday, July 11, 2008

वाटचाल

एकूण काय,
सगळी अंधारातली वाटचाल..
पावलापुढे पाऊल टाकत राहिलं, की काहीतरी घडल्या घडवल्यासारखं वाटतं इतकंच

नाही म्हणायला मधेच चमकून जातो एखादा काजवा
किंवा अगदीच उजळलं भाग्य तर टिपूर चांदणंसुद्धा
क्षण दोन क्षण दिसल्यासारख्या वाटतात
काही आकृत्या.. काही ठसे..
क्षण दोन क्षण खरंच वाटतं, अगदी मनापासून, की आता बरंच कळलं चालण्याबद्दल

पण ठेचा लागत राहतात अधून मधून,
काटे मोडत राहतात पायांत
आकृत्या ओळखू आल्या म्हणेस्तोवर निराळ्या भासतात
तोल जाताना चाचपडणाऱ्या हातांना काहीच लागत नाही
ठशांचे माग नाहीसे होतात..
म्हणजे दिशा बदलली.. की जागा..
की ते मुळातच कधी तिथे नव्हतेच..?

आणि मग मात्र भीती वाटायला लागते
कधीतरी लख्ख उजाडेल
आणि कधीच काहीच नव्हतंच हे कळेल याची!

एकूण काय,
सगळी अंधारातली वाटचाल..
पावलापुढे पाऊल टाकत राहिलं, की काहीतरी घडल्या घडवल्यासारखं वाटतं इतकंच!

7 comments:

Gayatri said...

वाटंच पाहत होते मी...लिहिलंस !
नेहमीप्रमाणेच आशयपूर्णं ! एकदम पटलं.
लख्खं उजाडायचं भाग्य आपल्या नशिबी असेल तर आणखी काय हवं ?

Anonymous said...

आज फारा दिसांनी माझ्या गूगल रीडरात लख्ख उजाडलं :-)

अप्रतिम लिहिलंय! रचनेचा अर्थ गूढ आणि आध्यात्मिक वाटला.

पूनम छत्रे said...

आणि मग मात्र भीती वाटायला लागते
कधीतरी लख्ख उजाडेल
आणि कधीच काहीच नव्हतंच हे कळेल याची!
>>>>
hmmm!
kaay lihites gaM! masta!

Meenakshi Hardikar said...

kharaya kadhitari lakhkha ujed padel yachi bhiti vatayala lagate. ani gayatri mhanate tasa te bhagyachahi ahecha. sagalyanchya nashibi nasanara. :)

Kamini Phadnis Kembhavi said...

क्षण दोन क्षण खरंच वाटतं, अगदी मनापासून, की आता बरंच कळलं चालण्याबद्दल......
farach mast

HAREKRISHNAJI said...

Swati .
I refer to your comments on Tulip's blog "हाथ से छू के इन्हें रिश्तोंका इल्ज़ाम ना दो..

अगदी नेमका वेध घेतला आहेस या भावनेचा. पुन्हा लिहायला लागल्येस याचं खूप बरं वाटतंय. :) "

How about you ? When are you going to start writing again?

माणिक जोशी said...

kyaa baat hai Swati... khaasach!!
chalaNyaabaddal ajun kaahich naahi kaLala.. he kaLala aaj he vaachun!:) dhanyavaad!!