Tuesday, July 10, 2007

समीक्षा

अर्धवट चाळून झाल्यावर
चिडून गाथा मिटत ते म्हणाले,
"काय हो या कविता!
ना विषयात वैविध्य आहे, ना मांडणीत!
शब्दसंपदा 'विठोबा' या एकाच शब्दात संपते, इतकी सुमार!
इंद्रायणीत या तरल्या याचं कारण आशयघनताच नाही, हेच असणार!
वर जिथे तिथे 'तुका म्हणे.. तुका म्हणे..' म्हणून आपल्याच नावाचा उदो उदो!!
अश्याने मराठी कवितेचं कसं होणार??!!!"

13 comments:

  1. :-) I better not spoil with my comments ! Awesome.
    -Vidya.

    ReplyDelete
  2. mast ,swati khupach Chaan aashaya ghanataa:) LOL
    sagaLyaach kavitaa sundar aahet ..!!!

    ReplyDelete
  3. बर्‍याच दिवसांनी बघितला तुझा ब्लॉग, मस्त! नेहेमीप्रमाणेच :)

    ReplyDelete
  4. बर्‍याच दिवसांनी बघितला तुझा ब्लॉग, मस्त! नेहेमीप्रमाणेच :)

    ReplyDelete
  5. मर्मचिकित्सा जबरी! ये दिल मॉंगे मोअर...:-)

    ReplyDelete
  6. humm he tucha lihavasa asaya ga.

    meenu

    ReplyDelete